भारतीय शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेत कमी ! ! !

भारतीय शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेत कमी  ! ! ! 

      
मित्रहो,
     
     "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे" असे महात्मा फुले यांनी "तृतीय रत्न" या त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे वारंवार जनतेस पटवून दिले. तसेच शिक्षण व्यवस्थेत प्रार्थमिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी हंटर कमिशन सोबत लढा दिला. अशा प्रकारचे अनेक लढे या नंतर राजर्षी शाहू, आंबेडकर, मुक्त साळवे, अशा महामानवांनी दिल्याचे आढलते. 
      
      आज भारतात विद्यार्थी शिक्षण घेवून पदवीधर होत आहे पण वैचारिक प्रगल्भतेत  मात्र फारसी वाढ होतांना दिसत नाही.आज याच विषयाला अनुसरून मी हा लेख लिहित आहे . विद्यार्थ्यांच्या जडण - घडणात त्याची वैचारिक प्रगल्भता वाढणे हे शिक्षणातली महत्वाची प्रक्रिया समजली जावी. 
बालपणात शाळेत नीती मूल्यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाई मात्र ती नीती मुल्ये आचरणात कशी हे सांगितले न जायचे.

      भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षण हे थेरोटीकल शिकवले जाते मात्र त्या शिक्षणाचा वास्तविक जीवनात कसा वापर करता येयील किंवा कसा करावा हे शिकवायचे प्रकर्षाने टाळले जाते. शिक्षण घेताना थियरी शिकणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो किंवा संपूर्ण पाने अमान्य करतो असे नाही . पण त्या थियरी चा वास्तविक जीवनातील घडामोडींशी कसा मेळ घालता येईल. हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे. 

   संशोधक हे दोन प्रकारचे असतात असे माझे मत आहे :
१ ) जे फक्त तर्काच्या अनुमानावर थियरी मांडतात 
२) ज्यांना थियरी काहीच माहित नाही पण स्वताच्या प्रयत्नाने नवीन शोध लावून संशोधन सिध्द करतात असे.

      भारतीय शिक्षण व्यवस्थेने फक्त नोकरी करण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे एवढीच दशा शिक्षण व्यवस्थेने भारतीय विद्यार्थ्यांची केली आहे .

बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल होणे गरजचे आहे . भारतात सर्वांना एकसमान प्रकारचे शिक्षण मिळाल्यास वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल . . .

दि  २५ एप्रिल २०१४

सत्यशोधक विचारक 
विकास दे लाड 
महाराष्ट्र भारत 
vikylad@gmail.com 
   

धर्मांध प्रवृत्तींमुळे जगात असुरक्षितता, अशांतता व अस्थिरता

धर्मांध प्रवृत्तींमुळे जगात असुरक्षितता, अशांतता व अस्थिरता 

मित्रांनो,
     आजचा माझा हा खास लेख धर्मवेड्या लोकांसाठी आहे. आज जगात जी काही असुरक्षितता, अस्थिरता., अशांतता आहे ती फक्त आणि फक्त धर्मांध झालेल्या वैचारिक प्रवृत्तीन्मुळेच . . .
      प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे अनेक वेळा आपण ऐकतो पण आम्ही दोन्ही बाजूंचा गांभीर्याने विचार करत नाही कारण आपल्यावर असलेल्या विचारांचा पगडा निर्णय घेण्यास आपल्याला अडसर ठरत असतो. 
जसे कि., लहान विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाचा किंवा त्या विचारांचा पगडा त्याच्या मनावर बिंबवला जातो आणि वारंवार त्याला त्या बद्दल जाणीव करून दिली जाते त्यामुळे अचानक समोर आलेल्या सत्य विचारला तो समोर गेल्यावर ते अमान्य करू लागतो,
काही जन त्या वेळेस अति उत्साहित होऊन किंवा सत्य परिस्थिती न समजून घेता त्यावर हल्ला करतात. मग त्याचे स्वरूप सौम्य असो किंवा रुद्र त्याची एक सुरुवात त्याला इतके धर्मांध बनवते कि तो मागचा पुढचा विचार न करता जो धर्मगुरू किंवा त्याचा प्रेषित जो निर्णय देतो त्याची अंमलबजावणी करतो अशी जगात अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.
काही युरोपियन व काही आशियाई राष्ट्रे प्रकर्षाने आढळून येतात. 
पाकिस्तान , इजिप्त , इराक़ अशा देशांमध्ये मुसलमान धर्म्गुरुंमुळे तर भारतात आर्यांमुळे लोकांमध्ये अशांतता पसरविण्यात आली.

 
तुम्ही किती लोक या मताशी सहमत असाल माहित नाही पण जर प्रकर्षाने विचार केला तर तुम्हासही नक्कीच आढळून येयील.

पाकिस्तान मधून अजमल कसाब नावाचा अतिरेकी भारतात घुसून हल्ला करून अनेक निरपराध माणसांचा हत्या करतो कारण त्याला दिलेली शिकवण , त्याच्या मनावर बिंबवलेल्या विचारांमुळे त्याने आपले आयुष्य या निरपराध माणसांना मारण्यासाठी अर्पण केले यासारखी अशी केती तरी युवक या धर्मांध शक्तींच्या विचारांना बळी पडले जातात. 

भारतात आर्यांनी धर्मांध शक्तीचा फायदा उठवत येथे गुलामी, शिक्षण बंदी , वर्ण व्यवस्था , उच्च - नीच , गरीब - श्रीमंत , अशी द्वी वर्ग व्यवस्था लागू केली आणि हजारो वर्षांपासून येथील माणसांना खुळपट कल्पनांमध्ये अडकवून ठेवले.

अशी हि धर्मांध व्यवस्था मुळासकट उपटून फेकण्याची वेळ आज आली आहे. 

आपली हि वैचारिक लढाई असल्यामुळे सत्य विचारांचा नक्कीच विजय होतो अशी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीरावांची शिकवण आहे . विद्रोहाची लाट भारतात तथागत भगवान बुद्ध , व चार्वाक्य यांनी केव्हाच पेटवली आहे. त्यामुळेच तर अनेक महामानव भारत भूमीला मिळाले 

आपल्या या सत्य विचारांचा नक्कीच विजय होणार हि आशा नाही तर विश्वास आहे.


एक सत्यशोधक विचारक :
विकास लाड 
महाराष्ट्र , भारत |
vikylad@gmail.com

 

: भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे :

: भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे :

                                                             शिवश्री विकास लाड




मित्रांनो,

हुतात्मा भगतसिंग हे तुम्हा आम्हा सारखेच तरुण . जो देश स्वतंत्र व्हावा यासाठी लहानपणापासून विविध आंदोलन सभा अशा अनेक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवलेला एक युवक. ज्यांनी वयाची अवघी २३ वर्षे आयुष्य जगले पण २३०० वर्षांपेखा जास्त दिवस टिकतील असे अनमोल विचारांचा खजिना मागे सोडून गेले.
      

आपणाला फक्त एक क्रांतिकारक म्हणून भगतसिंग आठवणीत आहे पण या पलीकडचे भगतसिंग एक विचारक, लेखक, कवी, शायर, वक्ता, पत्रकार, संपादक, कुशल संघटक, जागतिक अभ्यासक, अशा विविध पैलूंनी भगतसिंग अभ्यासातांना खरेच हाताची बोटे तोंडात जाऊन अवाक होते.

आज तुम्हा आम्हा युवकांना संघटीत होऊन राज्य कर्त्यान वीरोधात आवाज उठवला पाहिजे.
भगतसिंग यांचे विचार प्रत्येक तरुण या पर्यंत पोहचवण्यासाठी वीर भगतसिंग विद्यर्थि परिषद महाराष्ट्र भरात कार्य करीत आहे. यासाठी विविध स्पर्धा, मेळावा, मार्गदर्शन शिबीर, अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यान पर्यंत पोहचत आहे.
आपणही भगतसिंग यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि  मस्तिष्क, मन, मणका, मनगट या सक्षम करायच्या असतील तर आजच वी. भ. वि. प. मध्ये सामील व्हा .


इन्कलाब झिन्दाबाद . . . . .
सर्वांना लाल सलाम . . . . .           


-     9764970497       
  mss.vbvpnashik@gmail.com


नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :