भारतीय शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेत कमी ! ! !
मित्रहो,
"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे" असे महात्मा फुले यांनी "तृतीय रत्न" या त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे वारंवार जनतेस पटवून दिले. तसेच शिक्षण व्यवस्थेत प्रार्थमिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी हंटर कमिशन सोबत लढा दिला. अशा प्रकारचे अनेक लढे या नंतर राजर्षी शाहू, आंबेडकर, मुक्त साळवे, अशा महामानवांनी दिल्याचे आढलते.
आज भारतात विद्यार्थी शिक्षण घेवून पदवीधर होत आहे पण वैचारिक प्रगल्भतेत मात्र फारसी वाढ होतांना दिसत नाही.आज याच विषयाला अनुसरून मी हा लेख लिहित आहे . विद्यार्थ्यांच्या जडण - घडणात त्याची वैचारिक प्रगल्भता वाढणे हे शिक्षणातली महत्वाची प्रक्रिया समजली जावी.
बालपणात शाळेत नीती मूल्यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाई मात्र ती नीती मुल्ये आचरणात कशी हे सांगितले न जायचे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षण हे थेरोटीकल शिकवले जाते मात्र त्या शिक्षणाचा वास्तविक जीवनात कसा वापर करता येयील किंवा कसा करावा हे शिकवायचे प्रकर्षाने टाळले जाते. शिक्षण घेताना थियरी शिकणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो किंवा संपूर्ण पाने अमान्य करतो असे नाही . पण त्या थियरी चा वास्तविक जीवनातील घडामोडींशी कसा मेळ घालता येईल. हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे.
संशोधक हे दोन प्रकारचे असतात असे माझे मत आहे :
१ ) जे फक्त तर्काच्या अनुमानावर थियरी मांडतात
२) ज्यांना थियरी काहीच माहित नाही पण स्वताच्या प्रयत्नाने नवीन शोध लावून संशोधन सिध्द करतात असे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेने फक्त नोकरी करण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे एवढीच दशा शिक्षण व्यवस्थेने भारतीय विद्यार्थ्यांची केली आहे .
बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल होणे गरजचे आहे . भारतात सर्वांना एकसमान प्रकारचे शिक्षण मिळाल्यास वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल . . .
दि २५ एप्रिल २०१४
सत्यशोधक विचारक
विकास दे लाड
महाराष्ट्र भारत
vikylad@gmail.com
मित्रहो,
"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे" असे महात्मा फुले यांनी "तृतीय रत्न" या त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे वारंवार जनतेस पटवून दिले. तसेच शिक्षण व्यवस्थेत प्रार्थमिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी हंटर कमिशन सोबत लढा दिला. अशा प्रकारचे अनेक लढे या नंतर राजर्षी शाहू, आंबेडकर, मुक्त साळवे, अशा महामानवांनी दिल्याचे आढलते.
आज भारतात विद्यार्थी शिक्षण घेवून पदवीधर होत आहे पण वैचारिक प्रगल्भतेत मात्र फारसी वाढ होतांना दिसत नाही.आज याच विषयाला अनुसरून मी हा लेख लिहित आहे . विद्यार्थ्यांच्या जडण - घडणात त्याची वैचारिक प्रगल्भता वाढणे हे शिक्षणातली महत्वाची प्रक्रिया समजली जावी.
बालपणात शाळेत नीती मूल्यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाई मात्र ती नीती मुल्ये आचरणात कशी हे सांगितले न जायचे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षण हे थेरोटीकल शिकवले जाते मात्र त्या शिक्षणाचा वास्तविक जीवनात कसा वापर करता येयील किंवा कसा करावा हे शिकवायचे प्रकर्षाने टाळले जाते. शिक्षण घेताना थियरी शिकणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो किंवा संपूर्ण पाने अमान्य करतो असे नाही . पण त्या थियरी चा वास्तविक जीवनातील घडामोडींशी कसा मेळ घालता येईल. हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे.
संशोधक हे दोन प्रकारचे असतात असे माझे मत आहे :
१ ) जे फक्त तर्काच्या अनुमानावर थियरी मांडतात
२) ज्यांना थियरी काहीच माहित नाही पण स्वताच्या प्रयत्नाने नवीन शोध लावून संशोधन सिध्द करतात असे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेने फक्त नोकरी करण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे एवढीच दशा शिक्षण व्यवस्थेने भारतीय विद्यार्थ्यांची केली आहे .
बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल होणे गरजचे आहे . भारतात सर्वांना एकसमान प्रकारचे शिक्षण मिळाल्यास वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल . . .
दि २५ एप्रिल २०१४
सत्यशोधक विचारक
विकास दे लाड
महाराष्ट्र भारत
vikylad@gmail.com