मन
लेख :: विकास लाड
मन एक अत्यंत वेगवान , सर्वात शक्तिमान , अतृप्त, चंचल, अशा अनेक संकल्पना आपण मना शी जोडत असतो . आज एक विचार वाचला " ज्याने स्वताचे मन जिंकले त्याने जग जिंकले. " विचार अतिशय सत्य आहे . मी थोडासा अंतर्मुख झालो त्या वाचलेल्या वाक्यावर विचारमंथन करू लागलो .
वाक्य फक्त एका ओळीचे पण ते विचारांना चालना देण्यास प्रवृत्त करते. एक वेळ घोड्याला लगाम देणे सहज आहे परंतु मना वर लगाम लावणे अशक्य नाही पण अतिशय कठीण आहे . लहान बालका पासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांचे मन कधीच थाऱ्यावर किंवा स्थिर राहत नाही.
कारण एखादी व्यक्ती शांत बसलेली आहे पण त्याच्या मनातील वादळे फक्त त्यालाच माहित असतात.
मन स्थिर ठेवणे खरच खूप अवघड आहे . कधी कधी माणूस बाहेर एक आत एक असा वागत असतो म्हणजेच त्याच्या मनात काहीतरी लपंडाव चालत असतात ते कळने अशक्य आहे.
एखादा डॉक्टर मनोरुग्णा ला फक्त मानसिक पाठींबा किंवा सहानुभूतीदेवून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो पण तोही कोणाच्याही मनातील गोष्ट जाणून घेवू शकत नाही.
मन हे किती चंचल असते यावरूनचकळून येते. शाळेत विद्यार्थी शरीराने वर्गात बस्सालेला असतो पण मनाने तो क्रीडांगणंवर आपल्या विचारांची उंचच उंच पतंग उडवत असतो.
आयुष्यात विचार बोलून दाखवणे सहज सोपे असते पण ते आचरणात आणणे अतिशय कठीण असते .
मनाचे खेळ प्रत्येक जन अनुभवत असतो . कधी सुखावह तर कधी क्लेशकारक .
मन नाही मनात खरेच
मित्रांनो,
काय वाटते तुम्हाला ?
लेख : :
१९ मे २०१४
विकास लाड
नाशिक
vikylad@gmail.com
वाक्य फक्त एका ओळीचे पण ते विचारांना चालना देण्यास प्रवृत्त करते. एक वेळ घोड्याला लगाम देणे सहज आहे परंतु मना वर लगाम लावणे अशक्य नाही पण अतिशय कठीण आहे . लहान बालका पासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांचे मन कधीच थाऱ्यावर किंवा स्थिर राहत नाही.
कारण एखादी व्यक्ती शांत बसलेली आहे पण त्याच्या मनातील वादळे फक्त त्यालाच माहित असतात.
मन स्थिर ठेवणे खरच खूप अवघड आहे . कधी कधी माणूस बाहेर एक आत एक असा वागत असतो म्हणजेच त्याच्या मनात काहीतरी लपंडाव चालत असतात ते कळने अशक्य आहे.
एखादा डॉक्टर मनोरुग्णा ला फक्त मानसिक पाठींबा किंवा सहानुभूतीदेवून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो पण तोही कोणाच्याही मनातील गोष्ट जाणून घेवू शकत नाही.
मन हे किती चंचल असते यावरूनचकळून येते. शाळेत विद्यार्थी शरीराने वर्गात बस्सालेला असतो पण मनाने तो क्रीडांगणंवर आपल्या विचारांची उंचच उंच पतंग उडवत असतो.
आयुष्यात विचार बोलून दाखवणे सहज सोपे असते पण ते आचरणात आणणे अतिशय कठीण असते .
मनाचे खेळ प्रत्येक जन अनुभवत असतो . कधी सुखावह तर कधी क्लेशकारक .
"माझे मन नाही मनात
कधी आत तर कधी बाहेर
न मला ठाव न ठिकाण
कधी शांत तर कधी अशांत
माझे मन नाही मनात . . . . .
कधी उंच उंच झोक्यात
कधी खोल खोल पाण्यात
माझे मन नाही मनात . . .. .
जिंकेल दुसऱ्याचे मन आपसूक
पण स्वताचे स्वच्छंद लहरांत
माझे मन नाही मनात . . . . .
लहर आली तर करेल कहर
माझे मन नाही मनात . . . . .
नाही स्वर्गात नाही नरकात
हा भटकतो स्वत:त
माझे मन नाही मनात . . . . .
कधी भावूक कधी हळवा
खेळ खेळती लपंडावाचे
माझे मन नाही मनात . . . . .
माझे मन नाही मनात . . . . . .
माझे मन नाही मनात . . . . . .
माझे मन नाही मनात . . . . . .
मन नाही मनात खरेच
मित्रांनो,
काय वाटते तुम्हाला ?
लेख : :
१९ मे २०१४
विकास लाड
नाशिक
vikylad@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा