माणूस जगतो तो फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच . . . .

माणूस जगतो तो फक्त स्वत:च्या  स्वार्थासाठीच . .


आपण प्रत्येक वेळेस बोलत असतो तो / ती / ते / माझे / माझी ......... आहेत . हे सर्व आपण बोलतो ते फक्त समाजातील काही रूढ झालेल्या सवयींमुळे. . . आपण अनेकदा म्हणतो कि माझे ......... व्यक्तीवर खूप प्रेम आहे पण हे तितकेसे माझ्या मते खरे नाही.

लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची, एक मांजर आणि तिचे पिल्लू एका डबक्यात अडकतात त्या डबक्यात पाणी यायला लागते हळू हळू पाण्याची पातळी वाढायला सुरुवात होते , मांजर स्वत आणि त्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंच उंच उड्या घेवून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पाण्याची पातळी वाढतच असते शेवटी मांजर त्या पिल्लाच्या पाठीवर पाय ठेवून बाहेर पडते आणि ते पिलू त्या डबक्यातच मरते सारांश काय ? तर प्राणी सुद्धा फक्त स्वार्थाचाच विचार करतात . . 

त्याचप्रमाणे आपण अनेक बंधनांत अडकलेलो आहोत पण हे एक भावनिक पाश आहे वास्तविक पाहता कोणी कितीही जीव तोडून बोलले कि मी तुझ्यासाठी ........ करायला तयार आहे पण वेळ येताच त्याची फाटायला लागते . . . कारण त्याने व्यक्त केलेले प्रेम हे एक तर शारीरिक आकर्षण असू शकते किंवा नाटक किंवा ढोंग . . . 

कारण तो / ती व्यक्ती फक्त आणि फक्त स्वत:च्या स्वार्थाचाच विचार करत असते. .. 

कुणाकडून तरी आपल्याला काहीतरी मिळेल या हेतूने माणूस नाते संबंध वाढवण्यास सुरुवात करतो. मग तो हेतू त्याचा त्याच्या व्यवसायाशी संबंधित असेल किंवा मानसिक कारण असेल किंवा सामाजिक कारण असेल तर तो जगतो आणि जगतो फक्त स्वतसाठीच. . . 

प्रत्येकाचे फक्त आणि फक्त स्वतावरच प्रेम असते. . . 

म्हणून या जगात स्वार्थ खूप महत्तम समजला जातो. . . 

या लेखाचा तसा काही विशेष उद्देश नाही फक्त मनातील शब्दांना या द्वारे वाट मोकळी करून दिली कारण यामागे पण माझा स्वार्थ आहे माझा लेख खूप जणांनी वाचला पाहिजे. . . बरोबर कि नही. मित्रांनो,

विकास देविदास लाड
नाशिक           

औचित्य शहीद दिनाचे . . .

औचित्य शहीद दिनाचे . . .


मित्रांनो, 

        उद्या शहीद दिन . . .  .  आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूर वीर क्रांतिकारक , लेखक, पत्रकार,  गायक, देशभक्त , ओजस्वी आणि तेजस्वी तुम्हा आम्हा वयातील भगतसिंग , सुखदेव , आणि राजगुरू या तीनही क्रांती सूर्यांना लाल सलाम. . . . .

वयाची २३ वर्षे जीवन जगून १५० वर्षे उलटून ही अजून तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भगतसिंग यांना विनम्र अभिवादन, भगतसिंग यांचे नाव घेताच अंगावर शहारा आणि मनात क्रांती ची फुले उमलतात आणि त्यांचे कार्य नवीन प्रेरणा देवून जातात. . .

        खरे तर आज शहीद दिनाचे औचित्य साधून तुमच्या सोबत बोलत आहे. . . भगतसिंग यांचे विचार अजूनही व्यवस्थित तरुणांपर्यंत पोहचलेले नाहीत याची खंत वाटते. . .
भगतसिंग यांना माथेफिरू, वेडे, जहाल अश्या अनेक संज्ञा देवून बदनाम करण्यात आले आहे पण वास्तविक पाहता त्या कालावधीतील त्या त्यावेळेस झालेल्या अनेक घटनांचा अभ्यास केला असता त्यांचे वागणे हे योग्य आहे असे निदर्शनास येते. . . .
       
        वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी २ - ३ वर्षे नाशिक जिल्ह्यात तरुणांपर्यंत पोहचून भगतसिंग यांचे विचार पोहचवण्याचे कार्य केले त्याबद्दल मनस्वी खूप समाधानी आहे. . .
भगतसिंग हे उत्तम वाचक, लेखक, आणि ८ भारतीय व ६ परकीय भाषांचे ज्ञान अवगत असणारे असामान्य युवक   होते.

       देशासाठी अनेक ज्ञात - अज्ञात वीरांनी बलिदान दिले आहे शहीद दिनानिमित्त सर्व मावळ्यांना विनम्र अभिवादन . . . .

आपलाच
शिवश्री विकास लाड
नाशिक. . .
९७६४९७०४९७

|| जय जिजाऊ , जय शिवराय ||

आज आमच्या घराबाहेर काही लहान मुले खेळत होती. साधारणतः ६ ते ७ वर्षांची आहेत , खेळतांना "|| जय भवानी || जय शिवाजी || " असा एकेरी नावाने जोरजोरात जयघोष करत होती .
यात त्यांचा काही दोष नाही त्यांना उत्तेजन देणारे आपले बहुजनच आहेत .
मी नुकताच कामावरून येत होतो  घरात प्रवेश करत होतो आणि त्या मुलांचा अखंड जयघोष चालू होता.
मी दारातच थांबून त्या मुलांना माझ्या जवळ बोलावून चोकलेट चे आमिष दाखवून त्यांना
समजावून सांगितले कि शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत . तुम्ही जो खेळ खेळत आहात त्यात फक्त एक बदल करा . . . . 

मुले उत्साहाने काहीतरी नवीन सांगत आहे यामुळे लक्ष देवून ऐकायला लागली . . .
"|| जय भवानी जय शिवाजी ||" या ऐवजी " || जय जिजाऊ , जय शिवराय || " असे म्हणा . . .

मुले आनंदाने नवीन बदल ऐकून तसे उच्चार करू लागली आणि खेळायला गेली. . . .
आपण आपल्या पाल्यांना सभोवतालच्या चिल्ल्या -पाल्यांना प्रेमात आणि थोडक्यात काही गोष्टी समजावून सांगितल्या तर निरागस मनाच्या मुलांवर आपण नक्कीच परिवर्तन घडवू शकतो . . .
हा माझा छोटा प्रयोग यशस्वी झाला . . . समाधान आहे

 अजून खूप परिवर्तन करायचे आहे म्हणून लहान मुलांवर हि चांगले संस्कार व्हायला हवेत . .


शिवश्री विकास वंदना देविदास लाड
शिवसंघ प्रतिष्ठान नाशिक
९७६४९७०४९७

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :