औचित्य शहीद दिनाचे . . .
मित्रांनो,
वयाची २३ वर्षे जीवन जगून १५० वर्षे उलटून ही अजून तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भगतसिंग यांना विनम्र अभिवादन, भगतसिंग यांचे नाव घेताच अंगावर शहारा आणि मनात क्रांती ची फुले उमलतात आणि त्यांचे कार्य नवीन प्रेरणा देवून जातात. . .
खरे तर आज शहीद दिनाचे औचित्य साधून तुमच्या सोबत बोलत आहे. . . भगतसिंग यांचे विचार अजूनही व्यवस्थित तरुणांपर्यंत पोहचलेले नाहीत याची खंत वाटते. . .
भगतसिंग यांना माथेफिरू, वेडे, जहाल अश्या अनेक संज्ञा देवून बदनाम करण्यात आले आहे पण वास्तविक पाहता त्या कालावधीतील त्या त्यावेळेस झालेल्या अनेक घटनांचा अभ्यास केला असता त्यांचे वागणे हे योग्य आहे असे निदर्शनास येते. . . .
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी २ - ३ वर्षे नाशिक जिल्ह्यात तरुणांपर्यंत पोहचून भगतसिंग यांचे विचार पोहचवण्याचे कार्य केले त्याबद्दल मनस्वी खूप समाधानी आहे. . .
भगतसिंग हे उत्तम वाचक, लेखक, आणि ८ भारतीय व ६ परकीय भाषांचे ज्ञान अवगत असणारे असामान्य युवक होते.
देशासाठी अनेक ज्ञात - अज्ञात वीरांनी बलिदान दिले आहे शहीद दिनानिमित्त सर्व मावळ्यांना विनम्र अभिवादन . . . .
आपलाच
शिवश्री विकास लाड
नाशिक. . .
९७६४९७०४९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा