आयुष्यात घडणारा वैचारिक बदल हा परिवर्तनाचा पाया . . ! . . .

आयुष्यात घडणारा वैचारिक बदल हा परिवर्तनाचा पाया . .  . . .


                  भारतीय समाज व्यवस्थेने गेली  काही वर्षात अनेक आधुनिक बदल स्वीकारले आहेत ज्यात राहणीमान , पेहराव , यंत्र सामुग्री यात सातत्याने होणारे बदल तो अत्यंत तीव्रपणे आत्मसात करत आहे जसे कि चूल बंद होऊन सर्वत्र GAS आले , टेलिफोन बंद होऊन मोबाईल सेवा चालू झाली  हे आधुनिक बदल अत्यंत जलद गतीने होत होते . चांगली गोष्ट आहे पण त्याच समाज व्यवस्थेने सास्कृतिक बदल वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला तर तो आज पर्यंत . . .

           बदल हा परिवर्तनाचा अपरिहार्य भाग आहे , सामाजिक बदला बरोबर जर सांस्कृतिक , राजकीय , शैक्षणिक बदल होत गेल्यास आधुनिक भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही आडवू शकत नाही.

शिवश्री विकास लाड
नाशिक
२२ डिसेंबर २०१४


राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत माझ्या "मन नाही मनात " या लेखास द्वितीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाले.

कर्जत : रायगडची खान या मासिकातून दरवर्षी अनेक नवोदित कवी-लेखकांचे लेख प्रकाशित केले जातात.
दिवाळी विशेषांक २०१४ च्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत नाशिक चे  श्री. विकास देविदास लाड यांच्या "मन नाही मनात. . ." या लेखास वाचकांची भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर संयोजक व आयोजकांनी सुद्धा विकास लाड यांच्या लेखास दाद देवून अभिनंदन केले.

धन्यवाद रायगडाची खान परिवार

विकास लाड
नाशिक

धागा

: : धागा  . . . . . .  : :

दर्जीकडे गेल्यावर तो फाटलेली कापडे एकत्र करुन  त्याला विशिष्ट असा आकार देवून त्यांना एका धाग्यामध्ये बांधत असतो  तो बांधलेला / शिवलेला धागाच त्या कापडाला नवीन स्वरूप आकार प्राप्त करून देवून त्या कापडाला जोडून ठेवतो.

          तसेच आयुष्यात सर्वत्र विखुरलेल्या व्यक्ती इकडे तिकडे फिरत असतात त्यांना एकत्र करण्याचे काम विचार करत  असतात . व्यक्ती भेटतात बोलतात त्यांचे विचार मते कल्पना  जुळतात आणि नाती घट्ट जोडण्याचे शिवण्याचे  बांधण्याचे  कार्य विचार प्रवाह करत असतात आणि हेच विचारप्रवाह रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्व वैचारिक प्रवातून तयार झालेल्या धाग्याला देतात . . .

बरोबर कि नाही  ?
मित्रांनो ,  


विकास लाड 
vikylad@gmail.com

मन नाही मनात . . .

मन

लेख :: विकास लाड 


मन एक  अत्यंत वेगवान , सर्वात शक्तिमान , अतृप्त, चंचल, अशा अनेक संकल्पना आपण मना शी जोडत असतो . आज एक विचार वाचला " ज्याने स्वताचे मन जिंकले त्याने जग जिंकले. "   विचार अतिशय सत्य आहे . मी थोडासा अंतर्मुख झालो त्या वाचलेल्या वाक्यावर विचारमंथन करू लागलो . 

वाक्य फक्त एका ओळीचे पण ते विचारांना चालना देण्यास प्रवृत्त करते. एक वेळ घोड्याला लगाम देणे सहज आहे परंतु  मना वर लगाम लावणे अशक्य नाही पण अतिशय कठीण आहे . लहान बालका पासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांचे मन कधीच थाऱ्यावर किंवा स्थिर राहत नाही. 

कारण एखादी व्यक्ती शांत बसलेली आहे पण त्याच्या मनातील वादळे फक्त त्यालाच माहित असतात.
मन स्थिर ठेवणे खरच खूप अवघड आहे . कधी कधी माणूस बाहेर एक आत एक असा वागत असतो म्हणजेच त्याच्या मनात काहीतरी लपंडाव चालत असतात ते कळने अशक्य आहे. 

एखादा डॉक्टर मनोरुग्णा ला फक्त मानसिक पाठींबा किंवा सहानुभूतीदेवून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो पण तोही कोणाच्याही मनातील गोष्ट जाणून घेवू शकत नाही. 
मन हे किती चंचल असते यावरूनचकळून येते. शाळेत विद्यार्थी शरीराने वर्गात बस्सालेला असतो पण मनाने तो क्रीडांगणंवर आपल्या विचारांची उंचच उंच पतंग उडवत असतो. 

आयुष्यात विचार बोलून दाखवणे सहज सोपे असते पण ते आचरणात आणणे अतिशय कठीण असते .
मनाचे खेळ प्रत्येक जन अनुभवत असतो . कधी सुखावह तर कधी क्लेशकारक .


"माझे  मन नाही मनात
कधी आत तर कधी बाहेर 

न मला ठाव न ठिकाण 
कधी शांत तर कधी अशांत 

माझे मन नाही मनात . . . . .


कधी उंच उंच झोक्यात 
कधी खोल खोल पाण्यात 


माझे मन नाही मनात . . .. .

जिंकेल दुसऱ्याचे  मन आपसूक 
पण स्वताचे स्वच्छंद लहरांत

माझे मन नाही मनात . . . . .

लहर आली तर करेल कहर 

माझे मन नाही मनात . . . . . 

नाही स्वर्गात नाही नरकात 
हा भटकतो स्वत:त 


माझे मन नाही मनात . . . . .

कधी भावूक कधी हळवा 
खेळ खेळती लपंडावाचे 

माझे मन नाही मनात . . . . .
 माझे मन नाही मनात . . . . . .
माझे मन नाही मनात . . . . . .
माझे मन नाही मनात . . . . . . 

 मन नाही मनात खरेच 
मित्रांनो, 
काय वाटते तुम्हाला ?


लेख : :
१९ मे २०१४
विकास लाड 
नाशिक 
vikylad@gmail.com 




भारतीय शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेत कमी ! ! !

भारतीय शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेत कमी  ! ! ! 

      
मित्रहो,
     
     "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे" असे महात्मा फुले यांनी "तृतीय रत्न" या त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे वारंवार जनतेस पटवून दिले. तसेच शिक्षण व्यवस्थेत प्रार्थमिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी हंटर कमिशन सोबत लढा दिला. अशा प्रकारचे अनेक लढे या नंतर राजर्षी शाहू, आंबेडकर, मुक्त साळवे, अशा महामानवांनी दिल्याचे आढलते. 
      
      आज भारतात विद्यार्थी शिक्षण घेवून पदवीधर होत आहे पण वैचारिक प्रगल्भतेत  मात्र फारसी वाढ होतांना दिसत नाही.आज याच विषयाला अनुसरून मी हा लेख लिहित आहे . विद्यार्थ्यांच्या जडण - घडणात त्याची वैचारिक प्रगल्भता वाढणे हे शिक्षणातली महत्वाची प्रक्रिया समजली जावी. 
बालपणात शाळेत नीती मूल्यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाई मात्र ती नीती मुल्ये आचरणात कशी हे सांगितले न जायचे.

      भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षण हे थेरोटीकल शिकवले जाते मात्र त्या शिक्षणाचा वास्तविक जीवनात कसा वापर करता येयील किंवा कसा करावा हे शिकवायचे प्रकर्षाने टाळले जाते. शिक्षण घेताना थियरी शिकणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो किंवा संपूर्ण पाने अमान्य करतो असे नाही . पण त्या थियरी चा वास्तविक जीवनातील घडामोडींशी कसा मेळ घालता येईल. हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे. 

   संशोधक हे दोन प्रकारचे असतात असे माझे मत आहे :
१ ) जे फक्त तर्काच्या अनुमानावर थियरी मांडतात 
२) ज्यांना थियरी काहीच माहित नाही पण स्वताच्या प्रयत्नाने नवीन शोध लावून संशोधन सिध्द करतात असे.

      भारतीय शिक्षण व्यवस्थेने फक्त नोकरी करण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे एवढीच दशा शिक्षण व्यवस्थेने भारतीय विद्यार्थ्यांची केली आहे .

बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल होणे गरजचे आहे . भारतात सर्वांना एकसमान प्रकारचे शिक्षण मिळाल्यास वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल . . .

दि  २५ एप्रिल २०१४

सत्यशोधक विचारक 
विकास दे लाड 
महाराष्ट्र भारत 
vikylad@gmail.com 
   

धर्मांध प्रवृत्तींमुळे जगात असुरक्षितता, अशांतता व अस्थिरता

धर्मांध प्रवृत्तींमुळे जगात असुरक्षितता, अशांतता व अस्थिरता 

मित्रांनो,
     आजचा माझा हा खास लेख धर्मवेड्या लोकांसाठी आहे. आज जगात जी काही असुरक्षितता, अस्थिरता., अशांतता आहे ती फक्त आणि फक्त धर्मांध झालेल्या वैचारिक प्रवृत्तीन्मुळेच . . .
      प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे अनेक वेळा आपण ऐकतो पण आम्ही दोन्ही बाजूंचा गांभीर्याने विचार करत नाही कारण आपल्यावर असलेल्या विचारांचा पगडा निर्णय घेण्यास आपल्याला अडसर ठरत असतो. 
जसे कि., लहान विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाचा किंवा त्या विचारांचा पगडा त्याच्या मनावर बिंबवला जातो आणि वारंवार त्याला त्या बद्दल जाणीव करून दिली जाते त्यामुळे अचानक समोर आलेल्या सत्य विचारला तो समोर गेल्यावर ते अमान्य करू लागतो,
काही जन त्या वेळेस अति उत्साहित होऊन किंवा सत्य परिस्थिती न समजून घेता त्यावर हल्ला करतात. मग त्याचे स्वरूप सौम्य असो किंवा रुद्र त्याची एक सुरुवात त्याला इतके धर्मांध बनवते कि तो मागचा पुढचा विचार न करता जो धर्मगुरू किंवा त्याचा प्रेषित जो निर्णय देतो त्याची अंमलबजावणी करतो अशी जगात अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.
काही युरोपियन व काही आशियाई राष्ट्रे प्रकर्षाने आढळून येतात. 
पाकिस्तान , इजिप्त , इराक़ अशा देशांमध्ये मुसलमान धर्म्गुरुंमुळे तर भारतात आर्यांमुळे लोकांमध्ये अशांतता पसरविण्यात आली.

 
तुम्ही किती लोक या मताशी सहमत असाल माहित नाही पण जर प्रकर्षाने विचार केला तर तुम्हासही नक्कीच आढळून येयील.

पाकिस्तान मधून अजमल कसाब नावाचा अतिरेकी भारतात घुसून हल्ला करून अनेक निरपराध माणसांचा हत्या करतो कारण त्याला दिलेली शिकवण , त्याच्या मनावर बिंबवलेल्या विचारांमुळे त्याने आपले आयुष्य या निरपराध माणसांना मारण्यासाठी अर्पण केले यासारखी अशी केती तरी युवक या धर्मांध शक्तींच्या विचारांना बळी पडले जातात. 

भारतात आर्यांनी धर्मांध शक्तीचा फायदा उठवत येथे गुलामी, शिक्षण बंदी , वर्ण व्यवस्था , उच्च - नीच , गरीब - श्रीमंत , अशी द्वी वर्ग व्यवस्था लागू केली आणि हजारो वर्षांपासून येथील माणसांना खुळपट कल्पनांमध्ये अडकवून ठेवले.

अशी हि धर्मांध व्यवस्था मुळासकट उपटून फेकण्याची वेळ आज आली आहे. 

आपली हि वैचारिक लढाई असल्यामुळे सत्य विचारांचा नक्कीच विजय होतो अशी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीरावांची शिकवण आहे . विद्रोहाची लाट भारतात तथागत भगवान बुद्ध , व चार्वाक्य यांनी केव्हाच पेटवली आहे. त्यामुळेच तर अनेक महामानव भारत भूमीला मिळाले 

आपल्या या सत्य विचारांचा नक्कीच विजय होणार हि आशा नाही तर विश्वास आहे.


एक सत्यशोधक विचारक :
विकास लाड 
महाराष्ट्र , भारत |
vikylad@gmail.com

 

: भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे :

: भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे :

                                                             शिवश्री विकास लाड




मित्रांनो,

हुतात्मा भगतसिंग हे तुम्हा आम्हा सारखेच तरुण . जो देश स्वतंत्र व्हावा यासाठी लहानपणापासून विविध आंदोलन सभा अशा अनेक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवलेला एक युवक. ज्यांनी वयाची अवघी २३ वर्षे आयुष्य जगले पण २३०० वर्षांपेखा जास्त दिवस टिकतील असे अनमोल विचारांचा खजिना मागे सोडून गेले.
      

आपणाला फक्त एक क्रांतिकारक म्हणून भगतसिंग आठवणीत आहे पण या पलीकडचे भगतसिंग एक विचारक, लेखक, कवी, शायर, वक्ता, पत्रकार, संपादक, कुशल संघटक, जागतिक अभ्यासक, अशा विविध पैलूंनी भगतसिंग अभ्यासातांना खरेच हाताची बोटे तोंडात जाऊन अवाक होते.

आज तुम्हा आम्हा युवकांना संघटीत होऊन राज्य कर्त्यान वीरोधात आवाज उठवला पाहिजे.
भगतसिंग यांचे विचार प्रत्येक तरुण या पर्यंत पोहचवण्यासाठी वीर भगतसिंग विद्यर्थि परिषद महाराष्ट्र भरात कार्य करीत आहे. यासाठी विविध स्पर्धा, मेळावा, मार्गदर्शन शिबीर, अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यान पर्यंत पोहचत आहे.
आपणही भगतसिंग यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि  मस्तिष्क, मन, मणका, मनगट या सक्षम करायच्या असतील तर आजच वी. भ. वि. प. मध्ये सामील व्हा .


इन्कलाब झिन्दाबाद . . . . .
सर्वांना लाल सलाम . . . . .           


-     9764970497       
  mss.vbvpnashik@gmail.com


शहीद भगतसिंग यांची मे १९३१ मध्ये प्रकाशित झालेले जीवन परिचय पुस्तक आता खास तुमच्यापर्यंत संधीचे सोने करा आजच आपली मागणी कळवा


वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद (VBVP ) ची गरज का ?

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद

(VBVP )ची गरज का ?

असा प्रश्न कायम बरिच लोग विचारत असतात.ईतक्या विद्यार्थी संघटना असताना नवी विद्यार्थी संघटना का हवी ? असाहि युक्तिवाद हल्ली वारंवार केला जातो.त्याना काहि उत्तरे देणे गरजेचे आहे.तसेच काहि प्रश्न सुध्हा विचारणे गरजेचे आहे.
 

*आज पर्यन्त अशी कोणती विद्यार्थी संघटना आहे जिने विद्यार्थ्यांच्या मानसिक ,भावनिक ,सांस्क्रुतीक ,सामाजीक प्रश्नांवर आंदोलने केली.

*विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या फक्त आणि फक्त आर्थीक आहेत का ?


*सर्वच क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट व्हावी ह्या द्रुष्टिने विशेष अशी कोणती कामगीरी आज पर्यंत झालेली आहे 


*विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जर खर्या अर्थाने लढने होत असेल तर का त्यांची प्रश्न सुटु शकली नाहित.दिवसेंदिवस त्यांची प्रश्न अधिक तिव्र का होत आहेत ?


*ह्या प्रश्नांची उत्तरेच अजुन कुणीही दिलेली नाहित.देत नाहित.


फक्त आणि फक्त विद्यार्थ्याना गोल गोल आणि गोड गोड घुमवण्यातच बरेच धण्यता मानतात.


बदल होत का नाहि ? तर बदलाला पुरक अशी प्रामाणिक व्यवस्था आज पर्यंत उभी राहिली नाहि.
विद्यार्थी नेते राहिलित उभी पण विद्यार्थी संघटनाहि राहिल्या उभ्या पण विद्यार्थी चळवळि उभ्या राहत नाहि आहेत.
 


जर व्यवस्था बदलायच्या सर्वच गोष्टि जर असतील तर नवि व्यवस्था कुठय ?
हा सुध्हा सवाल उभा राहतो.
ह्या सर्व गोष्टि घटना डोळ्या समोर ठेवुन Vbvp व्यापक अशी चळवळ उभी राहत आहे.भगतसिंहानी पाहिलेले borderless समाजाचे स्वप्न डोक्यात घेवुण पुढे चालत राहु.ज्या त्या काळातल्या महापुरुष व चळवळिपर्यंत जे जे माणसे पोहोचली समाज पोहोचला त्यांच्या त्यांच्या आयुष्याचे कल्याण झालेले आहे..
ज्यांच्या पर्यंत ह्या गोष्टि पोहोचल्या नाहित किंवा पोहोचुनहि ज्याना त्याचा उपयोग करता आला नाहि.ते असेच किड्या मुंग्यानसारखे जगले व मेले.परत एकदा ज्याला ज्याला आपले आयुष्य सम्रुद्ध करायचे असेल त्यानी सामिल व्हावे.विद्यार्थ्यानी तर नक्किच यावे.



व्यवस्था हि कुणाची रखैल नसते.ति तुमची आमचीच असते.
 

विद्यार्थी हा जर ईथल्या सर्वच प्रकारच्या गुलामगिरीत अजुनहि अडकुन राहत असेल तर त्याला त्या गुलामगिरीतुन बाहेर काढुन समतावादि ,विद्न्यानवादी  समाजाकडे नेने आम्हि आमचे कर्तव्य समजतो.ज्याला ज्याला बदल हवे असतील त्यानी त्यानी नक्किच यावे.

आणि ज्याला ज्याला सदासर्वदा ईतरांच्या ढुंगणांच्या खाली अंधारात राहुन आपली गुजराण करायची असेल ते नाहि आलेत तरी चालतील.
 


VBVP येणार्यांच्या स्वागतासाठि कायम तत्पर आहे.आडवे येणार्ताना हि आडवे करण्यासाठि तत्पर आहे.
 


-पंकज रणदिवे.
वी.भ.वि.प. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष 

जळगाव.


'बुद्धीवान माणसं ज्यांना 'वेडी पोरं' म्हणतात, वाट चुकलेली म्हणतात, तेच पोरं क्रांत्या करतात.' 

- वीर भगतसिंग

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :