नमस्कार मित्रांनो,
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध असेल तर ज्ञान म्हणजे काय ? त्यासाठी चा आज चा उहापोह . . . .
खूप दिवसांपासून मनात द्वंद्व सुरु होते कि शिक्षण मोठे मानावे कि ज्ञान म्हटले तर दोघांचा जाण्याचा मार्ग एकच असला तरी त्यातील प्रकृती वेगळी आहे, ठेवण वेगळी आहे, दिशा वेगळी आहे, आणि म्हटलेच तर त्यातील स्त्रोत देखील वेगळा आहे.
आज शिक्षण घेणारे सर्वच शिक्षित-सुशिक्षित , रोजगार-बेरोजगार, कामगार-शेतकरी-व्यावसायिक, शिक्षक-विद्यार्थी, पालक सर्व च्या सर्वांनी शिक्षण घेतले आहे आणि यातील ९५ % व्यक्ती त्यांनी घेतलेल्या शिक्षणावरच धन्य मानतात. त्यांचा प्रवास येथेच संपतो किंवा संपवला जातो.
शिक्षण हि अखंड सुरु असणारी प्रक्रिया आपल्या भारतीय समाज रचनेत पाठ्यक्रमिक शिक्षण घेतले म्हणजे खूप शिक्षण घेतले असा समाज आपल्या येथील मंडळी करून घेत असतात.
B.A. झाले M.A. केले बस झाले माझे शिक्षण असे प्रत्येक शाखेतील विद्यार्थी म्हणत असतोच.
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध असेल तर ज्ञान म्हणजे काय ? त्यासाठी चा आज चा उहापोह . . . .
खूप दिवसांपासून मनात द्वंद्व सुरु होते कि शिक्षण मोठे मानावे कि ज्ञान म्हटले तर दोघांचा जाण्याचा मार्ग एकच असला तरी त्यातील प्रकृती वेगळी आहे, ठेवण वेगळी आहे, दिशा वेगळी आहे, आणि म्हटलेच तर त्यातील स्त्रोत देखील वेगळा आहे.
आज शिक्षण घेणारे सर्वच शिक्षित-सुशिक्षित , रोजगार-बेरोजगार, कामगार-शेतकरी-व्यावसायिक, शिक्षक-विद्यार्थी, पालक सर्व च्या सर्वांनी शिक्षण घेतले आहे आणि यातील ९५ % व्यक्ती त्यांनी घेतलेल्या शिक्षणावरच धन्य मानतात. त्यांचा प्रवास येथेच संपतो किंवा संपवला जातो.
शिक्षण हि अखंड सुरु असणारी प्रक्रिया आपल्या भारतीय समाज रचनेत पाठ्यक्रमिक शिक्षण घेतले म्हणजे खूप शिक्षण घेतले असा समाज आपल्या येथील मंडळी करून घेत असतात.
B.A. झाले M.A. केले बस झाले माझे शिक्षण असे प्रत्येक शाखेतील विद्यार्थी म्हणत असतोच.
आज चा जो आपला विषय आहे तो या शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात करावयाच्या कार्याविषयी व्यक्त करता येतो.
शिक्षण आणि ज्ञान प्राप्तीचे मार्ग ------>
१. ऐकणे ते समजून घेणे
२. लिहिलेलं समजून घेणे
३. वाचलेले समजून घेणे
४. अनुभवातून समजलेले
माझ्या मते ही झाली प्राथमिक टप्पा त्याची सुरुवात यापुढील जो मार्ग सुरु होतो तो स्व ची जाणीव करून देणारा , आत्मज्ञान जागृत करणारा, प्रगल्भ बनवणारा, ज्ञानज्योत तेवेत ठेवणारा, प्रकाश म्हणून अंधार काळोख संपवणारा, विचारवान धैर्यशील बनवणारा मार्ग आपल्याला ज्ञानातून मिळतो
आणि मित्रांनो हे ज्ञान मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे जिज्ञासा .
एखाद्या गोष्टीविषयी जाणून घेण्याची समजून घेण्याची त्याची उकल करण्याची त्यावर स्वताचे मत मांडण्याची विकसित करण्याची आणि त्यात असलेल्या चुकांची सुधारणा करून आणता येण्याची क्षमता जेव्हा आपली जिज्ञासेने पूर्ण होते तेव्हा ते आपल्याला स्वानुभवाने मांडता आलेले ज्ञान असते. त्या विषयातील अति सूक्ष्म बाबीन बद्दल असलेली आपली विश्लेषक ज्ञान आपल्याला इतरांहून वेगळे बनवते अर्थातच प्रगल्भ बनवते.
माझे माझ्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना सांगणे आहे कि अभ्यास करणाऱ्यांनी पुस्तके वाचून रट्टा न मारता त्यात्या विषयातील घटक समजून घ्यायला हवा . अभ्यास करत असतांना समजा इतिहास विषयाचे वाचन करीत असाल तर त्यासाठी पुढील उत्तरे स्वत शोधण्याचा तर्क लावण्याचा प्रयत्न करा
उदा. १८५७ उठाव ...........>
१. तो का झाला ? पाश्वभूमी काय ? करणे काय? तत्कालीन कोणती प्रदीर्घ कोणती ? परिणाम काय ? कुणात ? कशासाठी? केव्हा ? यासारखी प्रश्न स्वतालाच विचारून उत्तरे शोधणे याला जिज्ञासाधारित ज्ञानप्राप्ती म्हणतात
जिज्ञासेने वाचलेलं कधी विस्मरण होत नाही तर मित्रांनो तुम्ही पण नक्की प्रयत्न करून पाहाल हि आशा आहे. तुमच्या ज्ञानाचा झरा असाच वाहत राहो आणि तुमच्या ज्ञानाने आपल्या भारत देशाचे येथील नागरिकांचे तुमच्या ज्ञानाने सर्वांचे सार्थक होवो. आपला देश महासत्ता होवो येथील सर्व लोक ज्ञानी महाज्ञानी होवो आपल्या देशाला लाभलेला हा सनातन वारसा यापुढे अखंड तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी रट्टा न मारता ज्ञान प्राप्तीच्या साधनेत झोकून द्या .
आज आपल्या देशाला बलवान सशक्त बनवण्यासाठी युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी त्याच्या अंगी सद्गुण संचारित करण्यासाठी त्याला तपस्वी शूर बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकानो जागृत व्हा ! हीच जागृतावस्था कायम ठेवा . . . .
आपला देश महासत्ता होतांना माझ्या नजरेस दिसत आहे आपल्या देशाचे लौकिक वाढवण्यासाठी युवांनो तयार व्हा . ज्ञान दिल्याने अधिक वाढते संकुचित वृत्ती ठेवू नका तुम्हाला असलेले ज्ञान प्रसारित करा हाच आपला धर्म आणि कर्तव्य सर्व स्तरात आपला लौकिक वाढवावा
सर्वांनी जिज्ञासू व्हावे ! ज्ञान प्राप्त करावे ! ज्ञानदान करावे ! सर्वकाळ ||
विकासनाथ म्हणे | न धरावी आस | संकुचीतपणाची | सकळ काळ ||
विकास देविदास लाड
२०-१२-२०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा